Ad will apear here
Next
सावरकर जयंतीला त्यांच्या नातीचा रत्नागिरीत विशेष कार्यक्रम
शाहीर विनता जोशी सादर करणार ‘नमन वीरतेला’
रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची नात शाहीर विनता जोशी यांचा ‘नमन वीरतेला’ हा विशेष कार्यक्रम सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. २८ मे रोजी सायंकाळी पाच वाजता रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. 

या कार्यक्रमाचे नियोजन पतित पावन मंदिर, अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरीतील सावरकरप्रेमी, तसेच पुण्यातील ओडिसी व्हॉयेज इंडिया (एलएलपी) यांनी केले आहे. ‘नमन वीरतेला’ हा विशेष कार्यक्रम शाहीर विनता जोशी व त्यांचे सहकलाकार सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन डॉ. नयना कासखेडीकर यांचे आहे. यामध्ये सावरकर यांच्या जाज्ज्वल्य कार्याची व साहित्याची महती त्या कथन करणार आहेत.

विनता जोशी यांचा पतित पावन मंदिरात सादर होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे. या वेळी पतित पावन मंदिर आणि अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळ यांच्यातर्फे विनता जोशी यांचा यथोचित सन्मानही करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर यांनी दिली. पदाधिकारी राजू जोशी व संस्थेच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

विनता जोशी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर यांची नात. त्या महिला शाहीर म्हणून प्रसिद्ध आहेत. १९८३ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दी वर्षापासून सावरकरांच्या कार्याचा प्रचार व प्रसार या उद्देशाने त्यांनी पोवाडे व सावरकर गीतांच्या कार्यक्रमांना प्रारंभ केला. फेब्रुवारी २०१९पर्यंतच्या ३६ वर्षांत देशात व परदेशात मिळून त्यांनी १००५ कार्यक्रमांचे यशस्वी सादरीकरण केले आहे. 

२७ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांचा एक हजारावा कार्यक्रम अंदमान येथे सादर झाला. किल्ले रायगडावरील ‘शाहिरी रात्र’ या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलेल्या त्या एकमेव महिला शाहीर होत्या.

पुण्यातील सावरकरप्रेमींना रत्नागिरीत आणण्याचे नियोजन ओडिसी व्हॉयेज इंडिया (एलएलपी) संस्थेच्या मानसी नगरकर-जाधव करत आहेत. सावरकर यांच्या रत्नागिरीतील कार्याची ओळख पुण्यातील सावरकरप्रेमींना करून देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. विनता जोशी यांच्यासोबत सावरकरप्रेमींना रत्नागिरीत आणून सावरकर यांचे वास्तव्य असलेल्या रत्नागिरीतील वास्तूंना त्यांची भेट घडवून आणण्याचे कार्य त्या करत आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याची महती सांगणाऱ्या रत्नागिरीतील वास्तू म्हणजे पतित पावन मंदिर, विशेष कारागृहातील खोली, शिरगाव येथील दामले यांनी सावरकर यांचे वास्तव्य असलेली जतन केलेली खोली आदी ठिकाणी विनता जोशी व पुण्यातील सावरकरप्रेमी भेट देणार आहेत. सकाळी नऊ वाजता त्या विशेष कारागृहाला भेट देणार असून, त्या ठिकाणीही त्या छोटेसे सादरीकरण करणार आहेत.

रत्नागिरीतील सावरकरप्रेमींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पतित पावन मंदिर, अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळातर्फे अॅड. बाबा परुळेकर, विनता जोशी, मानसी नगरकर-जाधव यांनी केले आहे.

(‘अनादि मी अनंत मी’ या सावरकरांवरील नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण २८ मे २०१९पासून १२ भागांत प्रसिद्ध होणार असून, ते सर्वांना मोफत ऐकता येणार आहे. त्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)

सावरकरांचे विविध पैलू उलगडणारे लेखन वाचण्यासाठी खालील शीर्षकांवर क्लिक करा.  

रत्नागिरीतील प्रेरणादायी सावरकर स्मृतितीर्थ

सावरकरांची ई-बुक्स मोफत :
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZOCCA
Similar Posts
सावरकरांची नात म्हणून लंडनमध्ये तिरंगा फडकवताना अभिमान वाटला रत्नागिरी : ‘ज्या ब्रिटिशांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अनन्वित अत्याचार केले, त्याच ब्रिटिशांच्या लंडनमध्ये सावरकरांची नात म्हणून भारताचा तिरंगा फडकवण्याचे भाग्य मला गेल्या वर्षी लाभले. त्या वेळी ऊर अभिमानाने भरून आला होता,’ अशा शब्दांत शाहीर विनता जोशी यांनी सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत आपल्या भावना व्यक्त केल्या
रत्नागिरीतील प्रेरणादायी सावरकर स्मृतितीर्थ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि रत्नागिरीचे नाते अतूट आहे. सावरकरांचा कारावास, त्यानंतरची स्थानबद्धता, पतितपावन मंदिराच्या स्थापनेसारखी अजोड सामाजिक कामे रत्नागिरीला वेगळी ओळख निर्माण करून देणारी ठरली. सावरकरांना डांबून ठेवलेली कारागृहाची कोठडी आता स्मारकात रूपांतरित झाली आहे. एकूणच सावरकरांचा
सावरकरांवरील ‘हे मृत्युंजय’ नाटकाचा मे महिन्यात रत्नागिरीत प्रयोग रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमान शिक्षेच्या कालावधीवर आधारित असलेल्या ‘हे मृत्युंजय’ या नाटकाचा प्रयोग मे महिन्यात रत्नागिरीत होणार आहे. नाटकाच्या तिकिटांची विक्री होणार नसून, नाटक पाहिल्यावर प्रेक्षकांनी स्वेच्छामूल्य द्यायचे आहे. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे
स्वा. सावरकरांवरील ‘हे मृत्युंजय’ नाटकाचा १६ मे रोजी रत्नागिरीत प्रयोग रत्नागिरी : भाषाशुद्धीपासून स्वातंत्र्यलढ्यापर्यंत अनेक क्षेत्रांत अद्वितीय कामगिरी केलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या अंदमानमधील शिक्षेच्या कालावधीवर आधारित असलेल्या ‘हे मृत्युंजय’ या नाटकाचा प्रयोग १६ मे रोजी रत्नागिरीत म्हणजेच स्वातंत्र्यवीरांच्या कर्मभूमीत होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language